Thursday, June 11, 2026
spot_img
spot_img

अधिक मासातील संकष्टी चतुर्थीचे अद्भुत योग; शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

एक नजर महाराष्ट्र न्युज

अधिक मासातील संकष्टी चतुर्थीचे अद्भुत योग; शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

अधिक मासातील संकष्टी चतुर्थीचे अद्भुत योग; शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या       अधिक मासातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या गणपती पूजेचे शुभ मुहूर्त, लाभ आणि अमृत काळ. तसेच बाप्पाला प्रसन्न करणारी अचूक पूजा पद्धत आणि व्रत सोडण्याचा नियम पाहा.

अधिक मासातील संकष्टी चतुर्थीचे अद्भुत योग; शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

हिंदू धर्मात भगवान गणेशाला प्रथम पूजनीय देवता मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊनच केली जाते. आजचा दिवस गणेश पूजनासाठी विशेष मानला जातो, कारण आज ‘संकष्टी चतुर्थी’ आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान गणेशाची पूजा आणि व्रत केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धीचे आशीर्वाद मिळतात. आजच्या संकष्टी चतुर्थीचे महत्त्व अधिकच वाढले आहे कारण ही चतुर्थी अधिक मासात आली आहे. अशा शुभ योगात भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्तांना विशेष फलप्राप्ती होते आणि त्यांच्या कार्यातील सर्व अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे.

 

गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त |

लाभ मुहूर्त : सकाळी 06:00 वाजेपासून ते सकाळी 07:38 वाजेपर्यंत आहे.अमृत मुहूर्त : सकाळी 07:38 वाजेपासून ते सकाळी 09:16 वाजेपर्यंत आहे.विजय मुहूर्त : दुपारी 14:42 वाजेपासून ते दुपारी 15:34 वाजेपर्यंत आहे.

भगवान गणेशाची पूजा कशी करावे

व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करा.यानंतर भगवान गणेशाचे ध्यान करून व्रताचा संकल्प करावा.पूजेच्या ठिकाणी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरुण त्यावर भगवान गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी.त्यानंतर गणपती बाप्पाला फुले, हार, दूर्वा, अक्षता आणि हळद-कुंकू अर्पण करावे.जर दूर्वांचा हार उपलब्ध नसेल, तर तुम्ही 11 जोड्या दूर्वा वाहू शकता.धूप आणि गाईच्या तुपाचा दिवा लावून गणेश चालीसा, स्तुती आणि मंत्रांचे पठण करावे.संकष्टी चतुर्थीची व्रत कथा वाचावी.शेवटी भगवान गणेशाची आरती करून खऱ्या मनाने आपल्या इच्छा देवाच्या चरणी मांडा.

संकष्टी चतुर्थी व्रताची सांगता (पारण) कशी करावी?

चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे आणि विधीपूर्वक पूजा करून व्रताचे पारण करावे (उपवास सोडावा). श्रद्धा आणि नियमांचे पालन करून केलेले हे व्रत भगवान गणेशाची विशेष कृपा मिळवून देते. यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि कुटुंबात सुख, शांती तसेच समृद्धी नांदते अशी धार्मिक मान्यता आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या